Tuesday, September 29, 2015

THE REAL HERO !


Though I enjoy watching good television shows and movies on TV, yet my professional commitments restrains me from doing so.  When in the evening every one return to their homes from their workplaces, it is the time  for me to get back to my work .

No regrets AS MY FIRST LOVE IS MY WORK, MY DUTY- “DUTY TO SERVE MY PATIENTS”. My commitment towards medical profession precludes me watching TV shows and serials.

Frankly speaking I don’t fancy watching “ Sas –Bahu Zamela”  I love watching sensible and informative TV shows discovery or national geographic, ZEE Marathi or sometimes any good movie.

Other day after dinner when I was enjoying my favorite channel ZEE MARATHI I came to know that the “DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” movie praised by all was going to be broadcasted after two days in the evening. Somehow I missed the opportunity to watch the biopic on “THE REAL HERO” on a big screen.

But this time I never wanted to miss the golden opportunity watching it on small screen. So I decided to take a leave on the day of telecast of that movie.

About The Movie –

“ DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” -

The movie tales the life story of DR PRAKASH AMTE (THE SON OF BABA AMTE WHO DEDICATED ALL HIS LIFE FOR THE PATIENTS SUFFERING FROM LEPROSY)  and his wife Dr MRS MANDAKINI AMTE and  their continuous efforts for the upliftment of the tribals in the Hemalkasa in Gadchiroli district of Maharashtra. His contribution to society is immeasurable.

Just like his father, DR PRAKASH AMTE also had dreamt to serve the poor and the oppressed masses of the society. Unlike other doctors who would choose cozy lifestyle and practice in big metros,  DR PRAKASH AMTE choose to work in tribal areas of Hemalkasa and served tribals.

The eye opener was a trip to Hemalkasa with his father (BABA),  after completing his MBBS degree. He became restless seeing the pathetic life of tribals in the era, where people on the other side of the earth had already reached the moon, and when india is aspiring to be Super power, there were people living like animals. They use to hunt and sleep under the tree without medical facilities, proper housing and education. 

DR PRAKASH AMTE went there to treat them and became a part of them. AND THEN THE STORY BIGINS there in the dense forest of Hemalkasa.

He was not alone in this mission. His lovable, better half DR MANDAKINI (who was his classmate in medical college) and trusted and devoted team of like-minded individuals had joined his hands. 

The path was difficult, and long ranged. They struggle with tribals, wild animals, Naxalites and corrupt government officials. But overcoming every obstacle and sometimes bypassing them Dr Prakash Amte and him team achieved their goal. Today, after years of struggle, Hemalkasa has become “A paradise (NANDANVAN)"- an example to the world "how good can won evil".

There are many people who just live for themselves with their luxurious lifestyle and there are very few who lived for others. They work with passion towards making the world a better place to live in. DR PRAKASH AMTE IS ONE OF THEM. The couple offered selfless service for the sake of humanity.

Nana Patekar (In the lead role of DR PRAKASH AMTE) and Sonali Kulakrni (as Dr Mrs. MANDAKII AMTE) were the best as usual. The supporting cast also did their best.

The story itself is a great and inspirational for youngsters. Many people just talk about development but very few people actually work for people who are oppressed and under-privileged. Indian society needs REAL HEROS like DR PRAKASH AMTE.

THE BIOPIC ON DR PRAKASH AMTE definitely inspires true Indian and sets an example for those who are determined help the poor and oppressed section of the society, despite of hurdles and obstacles. 

“DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” is THE MUST WATCH MOVIE. The message of humanity,  patriotism and positive thinking  goes to the viewer in clear words. In my opinion youngster must watch this movie again and again.

I would like to watch this movie number of times. The movie had positive impact on my mind. Watching it again and again will keep me consciously awaken within and will lead me to the path of humanity, patriotism and charity.

I would really like to record the movie with the help of TATA SKY TRANSFER and will transfer it to my laptop and android so that I can watch it again and again  whenever I need inspirational thoughts.


Sunday, September 27, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - जाती पत्र , केतकी पत्र, अगस्ती पत्र

जाती पत्र (Jasminum officinale forma grandiflorum)


संस्कृत नाव- जाती, सुमना, हृद्यगंधा
मराठी नाव- जाई
हिंदी नाव- चमेली

जाती गुणधर्माने कडु, तुरट , उष्ण व त्रिदोषहर आहे. 

बाह्य उपयोग-
जाती व्रण रोपक, वेदना शामक, कण्डूघ्न , त्वचा रोगावर उपयुक्त आणि वर्ण्य अर्थात complexion enhancer  आहे. 
याचे उटणे लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो. 

मुख रोग (तोंड येणे) व दंतरोगात याची पाने चावतात किंवा काढल्याने गुळण्या करतात.

शिरःशूल, चक्कर येणे, मानसिक दौर्बल्यामध्ये याचे तेलाने शिरोभ्यंग करतात.

खाज येणार्या त्वचा रोगात व इतर ही त्वचा रोगात याच्या पानाचा लेप करतात.

जात्यादि तेल व घृत हे भाजणे ( burns) व इतर जखमांवरील उत्कृष्ठ औषध आहे. हे व्रण शोधन व रोपण करणारे आहे.

मंत्र- ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।

केतकी पत्र (  Pandanus odorotissimus ) 


संस्कृत नाव- केतक, सूचीपुष्प
मराठी नाव- केवडा
हिंदी नाव- केवडा

केवडा कडु, मधुर, तिखट व उष्ण आहे. केवडा त्रिदोषशामक आहे.

जाती प्रमाणे केवडा सुध्दा व्रण रोपक, वेदना शामक, आहे. 
केवडा केसांच्या वाढीसाठी हितकारक, दौर्गंध्यहर, आक्ष॓पहर आहे. 

आभ्यन्तर उपयोग-
केवडा मस्तिष्क दौर्बल्य जनित्त विकाघरामध्ये दिला जातो. 

हृदयाची धडधड (palpitations)  कमी करणारे आहे.

अग्निमांद्य व अजिर्णावर उपयोगी.

याच्या मुळाचा उपयोग प्रमेहामध्ये होतो.

मंत्र- ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।

अगस्ती पत्र (Sesbania grandiflora )


संस्कृत नाव- अगस्त्य 
मराठी नाव- अगस्ता
हिंदी- अगस्त

अगस्त कडु व शीत आहे म्हणून कफ-पित्त शामक आहे.

मुळ व सालीचा लेप संधिवात व गाऊट मध्ये लावल्यास वेदना कमी होतात. 

लहान मुलांना कफ झाल्यास अगस्तीच्या पानाचा रस 4 थेंब व मध चाटवावा. 

याच्या पानाचा रस अर्धशिशी व अपस्मार (आकडी आल्यास) नाकात 2 थेंब टाकतात. 

याचे पिकलेले फळ बुद्धी वर्धक आहे.
मंत्र- ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।

Saturday, September 26, 2015

21 पत्री व त्याचे औषधी गुणधर्म- दाडिम पत्र, देवदारू पत्र, मरु पत्र, अश्वत्थ पत्र

दाडिम पत्र (Punica granatum)

संस्कृत नाव- दाडिम, दन्तबीज, लोहीतपुष्प
मराठी नाव- डाळींब
हिंदी नाव-डाडम

आयुर्वेदोक्त गुणप्रयोग-

आयुर्वेदानुसार  डाळींब पचायला हलके, मधुर-कषाय- अम्ल रसाचे व अनुष्ण आहे. डाळींब त्रिदोषघ्न आहे (मधुर, कषाय म्हणून पित्त व उष्ण म्हणून कफ वात शामक). 

पित्तावर डाळींबाचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
डाळींबाचे  दाणे अग्निवर्धक व रूची उत्पन्न करणारे  आहेत. तापाने किंवा इतर आजाराने तोंडाची चव गेल्यास डाळींबाचे दाणे खावेत. 

अतिसार (diarrhoea) व प्रवाहीका ( dysentery ) वर याची साल व दाणे प्रशस्त ठरतात. जुन्या अतिसारावर ङाळीँबाची साल व  जिरे एकत्र द्यावे.  

कृमि रोगात याच्या मुळांचा काढा देतात. 
कषाय असल्याने याची  साल सूज कमी करणारी व व्रण भरून आणणारी आहे.

डाळींब बुद्धी ला बल देणारे व बुद्धी वर्धक आहे. 

खोकल्यामध्ये डाळींबाचा रस व मध वरचेवर चाटावा. 

स्वर बिघडला असल्यास रोज एक पिकलेले डाळींब खावे.


मंत्र-  ॐ बटवे नमः। दाडिम पत्रं समर्पयामि ।।


देवदारू पत्र (Cedrus deodara)

संस्कृत नाव- देवदारू, भाद्रदारू, सुरभुरुह  (देवतांच्या प्रदेशात हिमालयात  वृक्ष )
मराठी नाव - देवदार
हिंदी नाव - देवदार

याचा खुप उंच वृक्ष असतो ( साधारणतः  २५० फुट किंवा  त्यापेक्षा अधिक उंच )  खोड मोठे , सरळ असते. फांद्या खाली झुकलेल्या व वर निमुळत्या होत गेलेल्या असतात. पत्र सदाहरित व सुचीपर्णी असतात. फल ४-५ इंच लांब व भुरकट रंगाच्या त्रिकोणाकर बिया असतात.

याचे खोड व तेलाचा औषधात उपयोग होतो

आयुर्वेदानुसार देवदारु लघु गुणाचे, कडू रसाचे व उष्ण असल्याने कफ वात शामक आहे.

याच्या लेपाने सुज व वेदना  कमी होते व व्रण भरुन येतात.  तसेच याचा लेप कृमिघ्न ही आहे.

 वातशामक असल्याने देवदारु आभ्यंतर उपयोगाने वेदना कमी करणारे आहे. सांधे दुखणे, अंग मोडणे यावर देवदार १० ग्रॅम घेवुन त्याचा काढा बनवुन घ्यावा. किंवा  देवदाराचे १ ग्रॅम चूर्ण मधाबरोबर सकाळ - संध्याकाळ घ्यावे.

तिक्त (कडू ) असल्याने अग्निवर्धक, पाचक आहे. तसेच  ते कृमिघ्न व वातानुलोमक आहे.

देव दाराचे चूर्ण मधाबरोबर वारंवार चाटल्याने उचकी थांबते.

देवदार रक्तशोधक, हृदयोत्तेजक आहे .  त्यामुळे हृदयरोग , सुज तसेच रक्तविकारांमध्ये देवादार उपयोगी असते. 

देवदारु गर्भाशयाचे शोधन करते . म्हणून प्रसूती नंतर देवदाराचा काढा देतात. 

मंत्र -ॐ सुराग्रजाय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।


मरु पत्र  ( Majorana hortensis  ) 


संस्कृत नाव- मरुवक, खरपत्र
मराठी नाव- मारवा 
हिंदी नाव- मरुआ 
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा  युक्त सुगंधित क्षुप. याचे पंचांग औषधात वापरता 

आयुर्वेदानुसार मारवा  तिखट, कडू उष्ण आहे. हा कफ वाताजन्य विकारांवर उपयुक्त आहे. 
मरवा विषघ्न , जन्तुघ्न, वेदनाहर,  शोथहर,दुर्गंध नाशन,  त्वचेच्या दोषांचे निवारण करणारा  आहे. 
आमवात, संधिवात, दन्तवेदना व व्रणामध्ये मारव्याचा लेप करतात. किंवा त्याची धुरी घेतात.
मारवा  कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारा  ) व उचकी कमी  करणारा  आहे. 
मारव्याच्या पंचागाच्या काढ्याने भूक वाढते, पचन सुधारते. 
मारवा कृमिघ्न व  विषघ्न ही  आहे.
कष्टार्तव  ( dysmenorrhea ) व मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होत असेल तर मारवा उपयोगी होतो. 

मंत्र - ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।



अश्वत्थ पत्र (Ficus religiosa) 


संस्कृत नाव- अश्वत्थ, बोधिद्रु 
मराठी नाव- पिंपळ 
हिंदी नाव- पीपल 

याचा बहु वर्षायु मोठा वृक्षअसतो . याच्या फळ, छाल, श्रृंग व क्षीराचा उपयोग औषध म्हणून करतात.

याचा बहु वर्षायु मोठा वृक्ष असतो . 

भगवान बुद्धाला या झाडाच्या खाली बसून ज्ञान प्राप्त झाले म्हणून याला बोधी वृक्ष म्हणतात. पिंपळ बुद्धी वर्धक आहे.

अश्वत्थ अर्थात पिंपळ कषाय, मधुर व शीत वीर्याचा आहे. हा कफ-पित्त शामक आहे. 

बाह्य उपयोग- वर्ण्य म्हणजे वर्ण सुधारणारा, सुज व वेदना कमी करणारा, व्रण रोपक आहे. 
वर्ण विकारामध्ये अश्वत्थ श्रृंगाचा लेप लावतात. 

आभ्यन्तर उपयोग -
पिंपळ बुद्धी वर्धक आहे.
ज्यांची जिभेवर जड असते त्यांना जेवण पिंपळ पानावर गरमागरम जेवण दिल्याने फायदा होतो असे म्हणतात.

याची छाल रक्त स्राव थांबवण्यासाठी वापरले जाते. 

डाँग्या खोकल्यात याच्या सालीचा काढा देतात. तसेच फळाचे चूर्ण दम्यात देतात. 

गर्भामध्ये स्थापने साठी अश्वत्थ फलाचे चूर्ण दिले जाते. 
मंत्र - हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।

Friday, September 25, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - अर्जुन पत्र, विष्णूक्रान्त पत्र

अर्जुन पत्र  (Terminalia arjuna)

संस्कृत नाव- अर्जुन, धवल (बाह्य त्वक श्वेत असल्यामुळे )
मराठी नाव- अर्जुन सादडा 
हिंदी नाव- अर्जुन, कहुआ 

शुष्क डोंगराळ प्रदेशात, प्रामुख्याने नदीकिनारी आढळणारा ५० ते ६० फूट उंच वृक्ष.  याचे खोड  उंच सरळ,  बाहेरुन सफेद व आतून रक्त वर्णाचे असते. अर्जुन छालीचाच उपयोग औषधा करीता होतो. 

अर्जुन छालीचा हृदय विकारावारील उपयोग सर्वश्रुत  व प्रसिद्ध आहे. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

आयुर्वेदानुसार अर्जुन कषाय (तुरट )  रसाचा,  गुणधार्माने शीत   आहे व प्रभावाने हृद्य आहे. हृदयाच्या मांस  पेशींचे बल वाढवून त्याचे कार्य सुधारण्याचे काम अर्जुनामुळे होते. अर्जुनामुळे हृदय सशक्त,  उत्तेजित होउन हृत्स्पंदन सुधारते. अनेक संशोधनाद्वारे अर्जुनाच्या या गुणधर्मांवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
अर्जुन छालीने  हृत्शूल (angina pain ) कमी होउन हृदयाचे   कार्य   सुधारते. 
अर्जुन सुज कमी करणारे व anti-oxidant आहे 
अर्जुन रक्तातली चरबी ( cholesterol) कमी करण्याचे काम करते. यासाठी रोज अर्जुन क्षीरपाक घ्यावा.
अर्जुन क्षीरपाक बनवण्याची कृती-
2 ग्रॅम अर्जुन छाल चूर्णं, 1कप दूध व 1/4 कप पाणी घालून दूध शिल्लक राही पर्यंत उककळावे. व थोडी खडी साखर घालून सकाळी नाश्त्यानंतर घ्यावे.
या व्यतिरीक्त रक्त स्राव थांबवण्यास अर्जुन साली चा उपयोग होतो.
हाडं सान्धणारी वनस्पती म्हणून अर्जुन प्रसिद्ध आहे. याची सला पोटात घ्यावी व वरून साल बांधावी.
प्रमेह, मधुमेह व सदाह मुत्र प्रवृती वर ही अर्जुन उपयुक्त आहे.

मंत्र- ॐ  गजदन्ताय नमः। अर्जुन पत्रं समर्पयामि ।।

विष्णुक्रान्त पत्र (Evolvulus alsinoides )

संस्कृत नाव- विष्णूक्रान्त
मराठी नाव- विष्णू क्रान्ता, शंखावली
हिंदी नाव- विष्णूक्रान्ता
डोंगराळ खडकाळ प्रदेशात पावसात उगवणारी वनस्पती.
विष्णूक्रान्ता मेध्य म्हणजे बुद्धी वर्धक आहे.  तसेच  विष्णूक्रान्ताचा संस्थेवर  शामक कार्य होते. त्यामुळे अनिद्रा, नैराश्य वर उपयुक्त.
ज्वर व अतिसारावर याच्या मुळांचा काढा देतात.

मंत्र-  ॐ  विघ्नराजाय नम:। विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि ।।


Wednesday, September 23, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बृहती पत्र, अर्क पत्र


बृहती पत्र (Solanum indicum)




संस्कृत नाव - बृहती, क्षुद्र भण्टाकी (वांग्याप्रमाणे छोटे क्षुप)
मराठी नाव- डोरली
हिन्दी नाव- बडी कटेरी, बनभंटा
याचे प्राय: सर्वत्र होणारे, ३ ते ६ फूट उंचीचे छोटे क्षुप असते. काण्ड व पानांवर काटे असतात. पाने ३ ते ६ इंचाची खण्डीत व रोम युक्त असते. याला निळसर -जांभळ्या रंगाची फुले येतात. फळ छोटे गोलाकार, रेखांकीत, कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळे होते.
दशमुळातील १० औषधांपैकी एक औषध.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे बृहती तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची आहे. उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते.
वेदना युक्त अवयवांवर बृहतीफल, ह्ळद व दारूहळदीचा लेप लावतात.
त्वचेच्या विकारांवर उपयुक्त. कण्डूघ्न म्हणजे खाज कमी करणारे आहे. चाई (एलोपेशिया) या विकारावर याचा रस डोक्यावर लावतात.
पाचन संस्थेच्या विकारांमध्ये जसे भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, अपचन व कृमिं वर याचा उपयोग करतात.
हृदय दौर्बल्य व त्यामुळे येणारी सूज यातही उपयोगी पडते. इतर रक्तज विकारांवरही बृहतीचा उपयोग होतो.
कष्टार्तव किवा dysmenorrhea वर बृहती व बृहती असलेल्या दशमुलारिष्टाचा चांगला उपयोग होतो.
सर्दी, खोकला, दम्या मध्येही उपयुक्त असते. वैद्यांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करावा .

मंत्र - ॐ एकदंताय  नमः। बृहती पत्रं समर्पयामि ।।
 
अर्क पत्र ( Calotropis procera)











संस्कृत नाव - अर्क ( सुर्याप्रमाणे तिक्ष्ण व उष्ण), तूलफल (रूईदार फळ असलेले)
मराठी नाव- रूई
हिंदी नाव- आक, मदार
६ ते ८ फूट उंचीचे क्षुप. याचे कांड (खोड) कठीण, पाने मोठी, आयताकार असून त्यांचा खालील भाग रोमयुक्त असतो. फुले सुगधित, श्वेत वर्णाची वरती बैंगनी रंगाचे ठीपके असलेली असतात. फळे लंबगोल किंवा वेडीवाकडी असतात. सुकल्यावर ती फूटून त्यातून रूई बाहेर पडते.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे रुई  तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची वनस्पती आहे.
उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते. रक्तार्क पुष्प मधुर व कडू रसाचे असल्याने कफ -पित्त शामक आहे.

रुई बाहेरून लावल्यास वेदना व सूज कमी करणारे, जंतुघ्न, व्रणशोधक आहे.
आमवात व संधिवातावर दुखऱ्या सांध्यावर रुईची पाने तेलावर गरम करून बांधावीत.

त्वचाविकारांवरील हे उत्तम औषध आहे. त्वचारोगांवर रूइचे दूध, राईच्या  तेलातून लावतात.
श्वित्र म्हणजे ल्युकोडर्मा वर अर्काक्षीराचा लेप करतात. 

पोटाच्या अनेक विकारांवर  (यकृताचे आजार,  भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, पोट फुगणे अपचन व कृमिं ) रूईच्या मुळाच्या सालीचा उपयोग करतात.

श्लीपद  किंवा हत्तिरोगावरही मुळाची साल देतात. 

खोकला असताना कफ सुटण्याससाठी रुईच्या मुळांचा काढा देतात. 

रुई हे आयुर्वेदातील अतिशय गुणकारी औषध आहे. पण ते अतिशय तीक्ष्ण -उष्ण असल्याने त्याचा वापर जपून व वैद्यकीय सल्ल्यानेच करावा

मंत्र - ॐ कपिलाय नमः। अर्क पत्रं समर्पयामि ।।


२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - शमी पत्र, अपामार्ग पत्र

शमी पत्र  (Propsopis cineraria)


संस्कृत नाव- शमी, तुंगा , केशहंत्री ( केसांचा नाश करणारे )
मराठी नाव- शमी 
हिंदी नाव- छोंकर 
शुष्क प्रदेशात आढळणारे (गुजरात, राजस्थान ) मध्यम उंचीचा, कंटकीत वृक्ष. 

शमी तुरट, मधुर रसाचे व शीत गुणधर्माचे आहे.  शमी  कफ-पित्ताचे  शमन करते.  
याची साल विषघ्न आहे.  
शमीचे फल केश नाशक आहे.
हे बुद्धी वर्धक असल्याने स्मरण शक्ति वाढवण्यासाठी व मस्तिष्क दौर्बल्यामध्ये याचा वापर करतात. 
शमीची पाने रुक्ष, तुरट असून रक्तस्राव थांबवण्यासाठी व अतिसारामध्ये याचा वापर करतात. 
तज्ञांच्या सल्ल्यानेच याचाही वापर करावा. 
मंत्र - ॐ वक्रतुण्डाय  नमः। शमी पत्रं समर्पयामि ।।

अपामार्ग (Achyranthus n)

संस्कृत नाव- अपामार्ग , शिखरी 
मराठी नाव- आघाडा 
हिंदी नाव- चिडचिडी 
संपूर्ण भारतात आढळणारे १ ते ३ फूट उंचीचे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप. याची फुले मंजिरीत साधारणपणे १ फूट लांब, अधोमुख असतात. म्हणून याचे एका पर्यायी नाव प्रत्यक्पुष्पा आहे. याच्या फळामध्ये  तांदळांप्रमाणे दाणे असतात. त्यांना "अपामार्ग तंडूल" म्हणतात. याचे श्वेत व रक्त असे दोन प्रकार असतात. 

आयुर्वेदानुसार अपामार्ग  तिखट, कडु, गुणधर्माने उष्ण आहे व कफ वात शामक आहे. 
ऋषी पंचमीच्या दिवशी याचा उपयोग स्नान करण्यासाठी व तोंड धुण्यासाठी केला जातो. खरोखरच दातदुखीवर याचा उपयोग होतो. 

सुज व वेदना असताना याचा लेप करतात.
कान दुखत असल्यास अपामार्ग सिद्ध तेल कानात घालतात.

वृश्चिक दंशावर याच्या मुळाचा लेप त्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होते. तसेच मुळ पाण्यात उकळून  पिण्यास द्यावे. त्वचेच्या  विकारांवर (खरूज , नायटा) याच्या मुळाचा लेप लावतात. 

अपामार्ग अग्निवर्धक, पाचक पित्तसारक व कृमिघ्न आहे. याचे बिजा मात्र पचायला जड व मालावष्टम्भक आहे. 

आघाड्या पासून बनवलेले औषध " अपामार्ग क्षार " याचा उपयोग खोकला , दमा यावर होतो.
अपामार्ग क्षार मुत्राचे प्रामाणही वाधवतो. म्हणून किडनी स्टोन मध्ये इतर औषधां बरोबर याचा वापर करतात. पण याचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. 

मंत्र - ॐ गुहाग्रजाय  नमः। अपामार्ग  पत्रं समर्पयामि ।।

Monday, September 21, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - तुलसी पत्र , करवीर पत्र


तुलसी पत्र ( Ocimum sanctum)


संस्कृत नाव- तुलसी, विष्णु प्रिया, भूतघ्नी
मराठी नाव- तुळस
हिंदी नाव- तुलसी
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप. 

आयुर्वेदानुसार तुळस तिखट, कडु व उष्ण आहे. 
तुळशीचे औषधी उपयोग व तिचे गुणधर्म व तिचा महिमा सर्व श्रुत आहे.
तरी थोडक्यात तिचे गुणधर्म पाहू-
तुळस कफवात शामक, जन्तुघ्न, वेदनाहर,  शोथहर, त्वचेच्या दोषांचे निवारण करणारी आहे. 
तुळस कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारी) व क्षयनाशक आहे. यासाठी तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा.
सर्दीवर 7-8 तुळशीची पाने व 2/3 काळी मिरी घालून काढा करून प्यावा.लगेच बरे वाटते. 
तुळशीच्या रसाने किंवा तुळशीची पाने चावून खाल्ल्यास भूक वाढते, पचन सुधारते. 
तुळस कृमिघ्न आहे. तसेच ती विषघ्न ही आहे.
तुळशीच्या पानांचा रस हृदयासाठी हीतकर आहे.
तुळस रक्त शोधक आहे.
तुळशीच्या बिया बल वाढवणार्या, पित्त शामक व मुत्राचे प्रमाण वाढवणार्या आहेत.
अर्धशिशी व इतर शिरोवेदनेत तुळशीच्या रसाने नस्य करावे.
त्वचेच्या विकारांवर, तुळशीच्या पानांचा रस चोळून लावावा.
मंत्र - ॐ गजकर्णाय नमः। तुलसी पत्रं समर्पयामि ।।

 करवीर पत्र (Nerium indicum)



संस्कृत नाव- करवीर, अश्वमारक 
मराठी नाव- कण्हेर 
हिंदी नाव- कनेर 

प्रायः काश्मिर, नेपाळ सारख्या उंच डोंगराळ प्रदेशात आढळणारा सदाहरीत गुल्म.  पण हल्ली संपूर्ण भारतात आढळते  . फुले सुगंधित श्वेत किंवा लाल  रंगाची असतात. फळ लांब चपटी असतात.  त्यात अनेक भुऱ्या रंगाच्या बिया असतात. याचे श्वेत व रक्त असे २ प्रकार असतात.  
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

कण्हेर ही  विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  करावा. 
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये कण्हेरीचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे करवीराद्य तेल , करवीर  योग, महविषगर्भ तेल.  

कण्हेर कडू , तिखट, उष्ण वीर्याचे व कफ वात शामक आहे. 
वात विकारात व वेदनेत या  तेलाने मालिश करतात. 

अल्प मात्रेत कण्हेर हॄदयवर हृद्य ( हृदयाला बल देणारे ) आहे. पण अधिक मात्रेत हृदय अवसादक आहे म्हणून याचा वापर तज्ञांच्या देखरेखीखालीच करावा.
    

ॐ विकटाय नमः । करवीर पत्रं समर्पयामि ।।


Sunday, September 20, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म -बदरी पत्र, धत्तुर पत्र

बदर  पत्र ( Zizyphus jujube )
 




संस्कृत नाव- बदर 
मराठी नाव- बोर 
हिंदी नाव- बेर 
संपूर्ण भारतात तसेच यूरोप व ईस्ट एशिया मध्ये आढळणारे काटेरी क्षुप. याची फुले गुच्छात येतात. फळे मांसल छोटी लंबगोल व अतिशय मधुर असतात.

बोराची फळॆ पौष्टीक असून त्यात अनेक व्हीटामिन्स, मिनरल्स व ऍन्टी ओक्सिडंन्ट्स असतात. त्या मध्ये भरपुर प्रमाणात ए, बी, सी जीवनसत्व व प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम, फोस्फरस व लोहाचे प्रमाणही त्यात पुष्कळ असते. या कारणाने कुपोषण व कृशते मध्ये वजन वाढवण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो.

बोराच्या फळांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ति वाढण्यास तसेच शरीराचे बल वाढण्यास मदत होते.

बोराच्या फळांचा रस हृदयासाठी बल्य आहे.

शरीर दाह किंवा तापामुळे शरीराची आग होत असेल तर बोराच्या फळांचा रस घ्यावा. तसेच त्याच्या फळांचा रसाचा लेप लावावा.

आमवातावर बोराच्या पान व मुळाचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

बोराची बी उगाळून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्याची आग कमी होते.

केस गळत असल्यास बोराची पाने व त्रिफळ्याचा लेप डोक्यावर लावावा.

पिंम्पल्स व उष्ण्तेने येणारया उबाळांवर बोराच्या पानांचा लेप लावतात.

मंत्र - ॐ लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ॥


धत्तुर  पत्र  (Datura metel)


संस्कृत नाव- धत्तुर, कनक , शिवप्रिय 
मराठी नाव- धोत्रा 
हिंदी नाव- धत्तुरा 

संपूर्ण भारतात उगवणारे ३ते ५ फूट उंचीचे क्षुप . फुले लांब श्वेत किंवा जांभळ्या रंगाची प्रायः २-३ एकत्र येतात. फळ गोलाकार काटेरी असते. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये धोत्र्याचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे कनकासव, त्रिभुवन किर्ति रस, सुतशेखर, महाविषगर्भ तेल
तसेच धोत्र्यापासून अनेक आधुनिक औषधांचे ही निर्माण केले जाते. जसे हायोसाइमिन, एट्रोपिन, स्कोपोलेमिन ईत्यादि.

आयुर्वेदाच्या मताप्रमाणे, धोत्रा कडू, तिखट रसाचा उष्ण गुणधर्माचा आहे.

धोत्रा वेदनास्थापक म्हणजे वेदना कमी करणारा व मादक आहे.
धत्तुर पानांचा किंवा मुळांचा लेप किंवा तेल ( महाविषगर्भ तेल) वेदना व सूजेवर वापरतात.

अम्लपित्तावरील प्रचलित औषध सूतशेखर रस यातही अल्प प्रमाणात धत्तुर बीज असते. डिओडीनल  अल्सर वरही सूतशेखर रसाचा उपयोग होतो.

धोत्र्यापासून तयार झालेले कनकासव दम्यावर उपयुक्त असते. त्याने श्वास वाहिन्या विकसित होतात.
याच्या पानांच्या धुराने ही दम कमी होतो.
मंत्र: ॐ  हरसूनवे  नमः | धत्तुर पत्रं समर्पयामि  ||

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 





Saturday, September 19, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बिल्व पत्र , दूर्वा पत्र




बिल्व पत्र ( Aegle marmelos )


संस्कृत नाव- बिल्व, शाण्डिल्य (पीडा दूर करणारा)
मराठी नाव- बेल 
हिंदी नाव- बेल

संपूर्ण भारतात प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात, हिमालयात आढळणारा २५-३० फूट उंचीचा वृक्ष.
याला हिरवट-पांढरी सुगंधी फुले येतात. फळे,  कठीण २. ५ - ३  इंच व्यासाची सुंदर धुरकट पिवळसर रंगाची असतात.   

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
बेल   कषाय व  कडू रसाचे आणि  गुणधार्माने उष्ण  आहे. 
बेल विशेषतः वात-कफ  शामक आहे .
वातशमक असल्याने बेलाची पाने सूज व वेदना कमी करण्यास मदत करतात. वाताची वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या "दशमूळ" मधील बेल हे एक प्रमुख औषधी आहे. 
पचन  संस्थेच्या आजारांवर बेल फळाचा चांगला उपयोग होतो. 
१. कच्चे बेलफळ भूक वाढवणारे व पचन सुधारणारे आहे. ते ग्राही म्हणजे  अतिसार थांबवणारे व कृमिघ्न आहे . 
२. पिकलेले बेलफळ तुरट - गोड व मृदु रेचक आहे. 
३. बेलाच्या पानां च्या  रसाने यकृताचे कार्य सुधारून पित्ताचे विरेचन होते. 
४. खूप पिकलेल्या बेल फळाची मज्जा व खडीसाखर घेतल्यास  लगेचच  अतिसार व रक्तज अतिसार थांबतो. 
५. बेल, धणे , सुंठ व नागरमोथा चा काढा आमांशावर (अमिबिअसिस ) घ्यवा. 

बेलाच्या मुळाची साल व पानांचा रस हृदयासाठी बल्य व सूज कमी करणारे आहे 
याच्या पानांचा रस सर्दी, खोकला व दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
बेलाच्या पानांच्या रसाने रक्तातली साखर कमी किवा यासाठी रोज बेलाची २ -३ दळे चावून खावीत . 
मूत्र प्रवृत्ती जास्त प्रमाणात होत असल्यास बेलफळ मज्जा ६ग्रॅम  व सुंठी ३ ग्रॅम चा काढा घ्यावा. 



मंत्र: ॐ  उमापुत्राय नमः | बिल्व पत्रं समर्पयामि  ||


 दूर्वा पत्र    (Cynodon dactylon)



संस्कृत नाव- दूर्वा , शतपर्वा 
मराठी नाव- दूर्वा  
हिंदी नाव- दूब 

संपूर्ण भारतभर होणारे, जमिनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप .
याचे  १) श्वेत व  २) नील असे २ प्रकार असतात. त्या पैकी श्वेत दूर्वा औषधात वापरतात. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
दूर्वा चवीला तुरट , गोड व गुणधार्माने शीत ( शरीरातील उष्णता कमी करणारे) द्रव्य आहे. याच कारणाने क्रोधिष्ट गणेशाला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकावर दूर्वा  वाहतात. 
उष्णतेमुळे नाकाचा घोणा फुटल्यास नाकात दुर्वांचा २-२ थेंब रस घालता किंवा खडीसाखर घालून दुर्वांचा रस पिण्यासा देतात .
तापामुळे जेव्हा  अंगाची खुप आग होते तेव्हाही दूर्वा स्वरस खडीसाखारेबर दिल्यास दाह कमी होतो व ताप उतरतो.
पित्तामुळे होणाऱ्या शिरोवेदनेत दुर्वा स्वरस नस्य केल्यास शिरोवेदना कमी होते
त्वचा विकारांवरही दूर्वा उपयोगी थ्रते.
दूर्वा मेध्य (बुद्धिवर्धक) व मनाला शांत करणारी आहे. बुद्धिदात्या गणेशाची ती सर्वात आवडती वनस्पती आहे यात नवल ते काय?
मंत्र: ॐ  गजाननाय नमः | दूर्वा  पत्रं समर्पयामि  ||

Friday, September 18, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - मालती पत्र , भृंगराज पत्र

मालती पत्र (Hiptage madablota)-



संस्कृत नाव- माधवी, भद्रलता  
मराठी नाव- मालती, मधुमालती, हळदवेल 
हिंदी नाव- माधवीलता 

प्रामुख्याने महाराष्ट्रात व  पश्चिम प्रायः  आर्द्र हवामानाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप . थंडीत याला  फुले येतात. फुले सुंदर आकर्षक लाल व पांढ ऱ्या वर्णाची असून सुवासिक असतात.  
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
मालती कडू, तिखट, मधुर व कषाय  रसाचे गुणधार्माने शीत आहे. 
मालती त्रिदोषघ्न विशेषतः पित्तशामक आहे . 
जुनाट चिवट खोकल्या मध्ये याचा उपयोग होतो . याच्या पानांच्या रस दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
शरीराचा दाह   होणे  किंवा  पित्ताचे विकार कमी करणारे औषध . 
पानांचा रस सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
तसेच निरनिराळ्या त्वचा रोगांवर तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोगी. 



मंत्र: ॐ  सुमुखाय  नमः | मालती पत्रं समर्पयामि  ||


भृंगराज पत्र    (Eclipta alba )



संस्कृत नाव- भृंगराज 
मराठी नाव- माका 
हिंदी नाव- भांगरा

भारतात  प्रायः जलाशयाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप .
फुलांवरून याचे  १) श्वेत २) पीत व ३) नील असे प्रकार असतात. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
माका हे तिखट व कडू रसाचे गुणधार्माने उष्ण द्रव्य आहे. 
माका बल्य,  रसायन (वार्धक्य येण्याची गती मंदावणारे ), विषहर वनस्पती आहे. माका केश्य  म्हणजे केशवर्धक व केसांचा रंग व पोत सुधारणारे आहे. तसेच पाचनक्रिया सुधारून यकृताचे काम सुधारणारे आहे. माक्याच्या सेवनाने  पोटाचे व  पित्ताचे विकार कमी होतात. 
माका वातावरचे अत्यंत गुणकारी औषध आहे. माक्याचा रस काढून शरीराला चोळल्यास किंवा बाहेरुन सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
माक्याच्या रसाचे नस्य अर्धशिशी व इतर  प्रकारच्या  शिरोवेदनेवर उपयोगी  पडते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे माका हे बुद्धिवर्धक आहे. १ ग्रॅम माक्याचे चूर्ण, खडीसाखर , तूप व  मध यासाठी नियमितपणे घ्यावे. 
असा हा माका बुद्धिवर्धक व इंद्रियांची शक्ती वाढवणारा असल्यामुळेच कदाचीत बुद्धीदात्या गणेशाला अर्पण करत असावेत. 


मंत्र: ॐ  गणाधिपाय नमः | भृंगराज  पत्रं समर्पयामि  ||

Thursday, September 17, 2015

WELCOME TO LORD GANESH !



Despite the fact that more than half of the population in India is living in poverty we Indians celebrate many festivals with lot of fanfare. 
We Indians have established our festive - loving image all over the world. People from other countries find it strange and blame Indians being insensitive.

But, personally I believe that festivals are necessary. Rich or poor, VIP and common man all celebrate festivals as per their capacities. Celebrating various festivals is a kind of recreation for Indians. Festivals bring in moments of happiness in distressed and dejected life of the common man.

These " CHOTI CHOTI KHUSHIYA" are necessary in life. DON'T YOU THINK SO ?

Apart from bringing happiness, celebration of every festival has some hidden scientific reasoning. Most of the festivals are celebrated considering environment, transitions in seasons and related health issues. The rituals performed during these festivals and offerings (different kinds of fruits, leaves and flowers etc.) used in these rituals give us some solutions or remedies to tackle health issues and bring us close to the nature.

Though in India festivals are celebrated through out the year but the main Festive season begins with "Shravan" which falls mostly in the month of "August -September".

In Maharashtra , the" MAHA _UTSAV - THE BIG FESTIVAL " of LORD GANESH which starts on "Bhadrapada Shuddha Chaturthi" is the crown of all festivals.

Idol of GANESH is worshiped devoutly every where and offerings of different fruits, flowers and leaves of 21 herbs are made to "Buddhidayaka" , "Aarogyadayaka" and "Vigha harta and Dukha harak" LORD GANESH. Now the million dollar question is that why these selected 21 leaves only are offered to GANESH ?

Ayurved offers the explanation.

Actually, the time of Ganesh festival is the time of cusp of the rainy season and the autumn. During this time our digestive fire is at stake. Many of us are tend to get diseases related to Kapha and Pitta.

Cough, cold, throat infection, fever, breathing problems, bronchitis, dengue , malaria, swine flu, diarrhea, hyper acidity , skin infections are some common ailments found during this season.

Ayurved defines "Dukha or sorrow "as diseased state of human being. So one who is Dukhaharta must have tools to alleviate (dukha) diseases. The offerings made to LORD GANESH of these 21 varieties of leaves of plants along with recitation of specific mantra, have great medicinal values and have lot of importance in treating various diseases.

During this season these leaves are available in plenty. Wouldn't it be wise to collect these medicinal herbs- leaves, store them and keep them handy which will help to fight against various ailments.


A list of 21 varieties of leaves and a specific mantra associated with them is given below-
१) ॐ  सुमुखाय नमः। मालती पत्रं समर्पयामि  ।।
२) ॐ गणाधिपाय नमः। भृंगराज पत्रं समर्पयामि ।।
३) ॐ उमापुत्राय नमः । बिल्व पत्रं समर्पयामि ।।
४) ॐ गजाननाय नमः । दूर्वा पत्रं समर्पयामि ।।
५) ॐ लम्बोदराय नमः । बदरी पत्रं समर्पयामि ।।
६) ॐ हरसूनवे नमः।धत्तूर पत्रं समर्पयामि ।।
७) ॐ गजकर्णाय नमः ।तुलसी पत्रं समर्पयामि ।।
८) ॐ विकटाय नमः ।करवीर पत्रं समर्पयामि ।।
९) ॐ वक्रतुण्डाय नमः । शमी पत्रं समर्पयामि ।।
१०) ॐ गुहाग्रजाय नमः।अपामार्ग पत्रं समर्पयामि ।।
११) ॐ एकदंताय नमः । बृहती पत्रं समर्पयामि ।।
१२) ॐ कपिलाय नमः । अर्क पत्रं समर्पयामि ।।
१३) ॐ गजदन्ताय नमः । अर्जुन पत्रं समर्पयामि ।।
१४) ॐविघ्नराजाय नमः।विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि
१५) ॐ बटवे नमः । दाडिम पत्रं समर्पयामि ।।
१६) ॐ सुराग्रण्याय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।
१७) ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।
१८) ॐ हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।
१९) ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।
२०) ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
२१) ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।