Thursday, January 19, 2017

कडु by default पण गुणकारी !


डॉक्टर, हा समीर बघा ना! तुम्ही दिलेला काढा बिलकूल घेत नाही. काढा पिताना फार कटकट करतो" माझ्या शाळेतल्या वर्ग मित्राची बायको लाडीकपणे त्याची तक्रार माझ्या कडे करत होती. "अग पण तो काढा रोज न चुकता घेतो असं म्हणाला मला".
ती उद्वेगाने म्हणाली " नाही हो . आत्ता तुम्ही च काय ते सांगा त्याला". असं म्हणून तिने फोन त्याच्या ताब्यात दिला. फोन हातात आल्या बरोबर समीर ने माझा पाणउताराच करायला सुरुवात केली . "अगं काय गं ते तुझं औषध  ! इतकं जार कडु औषध सकाळी सकाळी बायको माझ्या घशात ओतते. माझा अख्खा दिवस बेकार आणि कडु जातो".
मी मध्येच तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. मी म्हंटले अरे पण " good medicine tastes bitter. "
त्याने लगेच उत्तर दिले " हो ना? Ok. Then you taste your own medicine first. त्यात तुझी पण चुक नाही म्हणा, कारण आयुर्वेदीक औषध॓ आणि आयुर्वेदिक डॉक्टर by default कडू असतात. "
एवढी प्रशंसा ऐकल्यावर मी पुढे तोंड उघडलं नाही.

आयुर्वेदाची प्रॅक्टीस करताना येणारा हा रोजचा अनुभव. बरेचसे पेशंट्स काढे घ्यायला फारच कंटाळा करतात. त्यांना औषधे देणे म्हणजे आम्हा वैद्यांच्या डोक्याला ताप असतो.
पण काही पेशंट्स मात्र फार गुणी असतात. अगदी आवर्जुन सांगतात ' सुरुवातीला थोडा त्रास झाला हो डॉक्टर काढा घेतांना पण आत्ता सवय झालीय."
काही पेशंट्स तर जार कडु औषध सुध्दा आवडीने आणि चवीने घेतात. माझा भाऊही त्यातलाच. त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याची taste आत्ता develop झालीय काढ्यासाठी.

खरं आहे, आयुर्वेदाची औषधं घेण्यासाठी कि नाही
taste develop  करावी लागते. निरनिराळ्या चवीची औषधे घेण्यासाठी जिभेला तशी सवय लावावी लागते.  जसं आपण थाई, कान्टीनेन्टल, चायनीझ  वगैरे फूड साठी टेस्ट डेव्हलप करतो ना अगदी तसंच! बरेच वेळा आपण अर्ध कच्चे, बेचव पदार्थ ही आवडले नसले तरी त्यांची तारीफ करून खातोच की..प्रेस्टीज म्हणून. अगदी चित्र विचित्र चायनिझ मांसाहारी पदार्थ सुध्दा! मग ते खाताना त्याचा स्वास्थ्यावर काय परिणाम होतो त्याचा ही आपण बिलकूल विचार करत नाही.

मग जी औषध थोडी कडु असतात पण आरोग्यासाठी हितकारक असतात ती घेताना चवीकडे लक्ष का द्यावे?
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर त्रिफळा,हळद,नीम, गुडुची असलेला पथ्यादि काढा म्हणजे डोकेदुखी वरचं एक रामबाण औषध. किंवा काडेकिराईत, गुडुची सारखी  जार कडु औषधं घालून तयार केलेला वासादशांग क्वाथ कितीही कडू असला तरी काविळी मध्ये अमृत तुल्य आहे. लगेच भूक वाढवतो. रास्नासप्तक काढा नुसताच कडु नाही पण वेगळाच लागतो. पण कितीतरी संधिवाताचे रुग्ण हा काढा घेऊन pain killer न घेता वेदना रहित उत्तम आयुष्य जगतात.
अशी गुणकारी आयुर्वेदिक औषधे घेतांना आपण एवढे आढेवेढे का घेतो?

औषध म्हणून घेतला तर मध ही कडु लागतो आणि जर चवी ने खाल्ले तर कारले ही  गोड लागते आणि कडू किराईतही  मधुर भासतो.
म्हणून फ्रेंड्स आपणही आपल्या आरोग्यासाठी,  हितकारक आणि आजारपणाला दूर ठेवणाऱ्या आयुर्वेदीक औषधासाठी टेस्ट डेव्हलप करून त्यांना जवळ नको करायला का?

लेखिका
By default कडु आयुर्वेदीक डाॅक्टर
"डॉ. संध्या कदम
एम् डी (आयुर्वेद)


हल्ली social media वर आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच पोस्ट्स,  मेसेजेस् ची देवाणघेवाण होत असते. एक आयुर्वेद तज्ञ म्हणून त्यातले बरेचसे विचार /मतं मनाला पटत नाहीत. पण प्रत्येक पोस्ट ला काॅमेंट देत बसण्या इतका वेळ आणि पेशन्स नसतो. पण कधी कधी आयुर्वेदाच्या नावाखाली काही ही चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात तेव्हा मात्र मन खट्टू होतं.

Social media  वरून आपल्यावर निरनिराळ्या सूचनांचा भडीमार होत असतो. हे खा, ते प्या अमुक करा, तमुक करू नका, सकाळी उठल्यावर  1 लिटर पाणी प्या इत्यादी इत्यादी. अहो आयुर्वेदात पाणी किती आणि कुठल्या वेळेस प्यावे, कोणी जास्त पाणी प्यावे, कोणी जास्त पिऊ नये या बद्दल विस्तृत विवेचन केले आहे. .

परवाच वाचलं तुम्हाला healthy रहायचं असेल तर रोज अर्धा तास चाला, 20 मिनिटंच जाॅगिंग करा आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटंच धावा. आत्ता घ्या! पन्नाशीला आल्यावर संधीवातामुळे आधीच आपले सांधे कुरबुर करायला लागलेले असतात. चालणं ठीक आहे पण त1/2 तास चालण्याबरोबर,  20 मिनिटं जाॅगिंग आणि 20 मिनिट रोज धावलो तर गेले की आपले गुडघे कामातून! लवकरच  knee replacement च्या तयारीला लागावे लागेल हे निश्चित.

अशीच एक चुकीची सूचना  आयुर्वेदाच्या नावावर खपवली जाते ती म्हणजे म्हणजे वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध घालून घ्या! हे चुकीचे आहे. पण एखादी चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि ती आपल्याला हळूहळू खरी वाटायला लागते. यालाच म्हणतात Gobbles technique !
आयुर्वेदाला गरम पाणी आणि मध हे combination  मान्य नाही. आयुर्वेदात सांगितले आहे "उष्णमुष्णारमुष्णे स युक्तम् चोष्मैर्निहन्ति तत्।" म्हणजे मध गरम करून खाणे, गरम पदार्थांबरोबर mix  करून खाणे किंवा गरम पाण्यावरोबर घेणे वर्ज्य आहे.
तुम्ही कधी मध गरम करून पाहिला आहे का? करून बघा. तो गोदासारखा होतो. त्याची चव बदलते, तो कडु होतो. आणि हा असा मध पचायला जड असतो व शरीरात आम (toxins)  निर्माण करतो.

एका  रिसर्च प्रमाणे  मध गरम केला किंवा गरम पाण्यातून घेतला तर त्यत negative physics-chemical reactions होतात आणि त्यात काही विषद्रव्ये (toxic substances)  तयार होतात जसे  त्यात HMF (hydromethyl furfuraldehyde) चे प्रमाण वाढते, pH वाढते,  त्याची consistency change होते, Browning वाढते, त्याची चव बदलते इत्यादी.
जर दररोज गरम पाण्यातून मध घेतल्यास  मधामधील होणारे physics-chemical changes शरीरासाठी हानीकारक (genotoxic, carcinogenic ) असतात. असेच परिणाम मध व तूप समप्रमाणात एकत्र केल्यासही होतो. म्हणून आयुर्वेदाने मध व तुपही समप्रमाणात घेऊ नये असं सांगितले आहे.

आयुर्वेदात सांगितलेले नियम प्रकृती सापेक्ष आणि व्याधी सापेक्ष सांगितलेले आहेत, random नाहीत.  म्हणूनच सोशल मिडीया वरील माहिती वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आयुर्वेद  तज्ञाकडे जाऊन च योग्य तो सल्ला घेतलेला बरा..

Dr Sandhya kadam
9967550282
drsandhyakadam1509@gmail.com