Thursday, January 19, 2017


हल्ली social media वर आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच पोस्ट्स,  मेसेजेस् ची देवाणघेवाण होत असते. एक आयुर्वेद तज्ञ म्हणून त्यातले बरेचसे विचार /मतं मनाला पटत नाहीत. पण प्रत्येक पोस्ट ला काॅमेंट देत बसण्या इतका वेळ आणि पेशन्स नसतो. पण कधी कधी आयुर्वेदाच्या नावाखाली काही ही चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात तेव्हा मात्र मन खट्टू होतं.

Social media  वरून आपल्यावर निरनिराळ्या सूचनांचा भडीमार होत असतो. हे खा, ते प्या अमुक करा, तमुक करू नका, सकाळी उठल्यावर  1 लिटर पाणी प्या इत्यादी इत्यादी. अहो आयुर्वेदात पाणी किती आणि कुठल्या वेळेस प्यावे, कोणी जास्त पाणी प्यावे, कोणी जास्त पिऊ नये या बद्दल विस्तृत विवेचन केले आहे. .

परवाच वाचलं तुम्हाला healthy रहायचं असेल तर रोज अर्धा तास चाला, 20 मिनिटंच जाॅगिंग करा आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटंच धावा. आत्ता घ्या! पन्नाशीला आल्यावर संधीवातामुळे आधीच आपले सांधे कुरबुर करायला लागलेले असतात. चालणं ठीक आहे पण त1/2 तास चालण्याबरोबर,  20 मिनिटं जाॅगिंग आणि 20 मिनिट रोज धावलो तर गेले की आपले गुडघे कामातून! लवकरच  knee replacement च्या तयारीला लागावे लागेल हे निश्चित.

अशीच एक चुकीची सूचना  आयुर्वेदाच्या नावावर खपवली जाते ती म्हणजे म्हणजे वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध घालून घ्या! हे चुकीचे आहे. पण एखादी चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि ती आपल्याला हळूहळू खरी वाटायला लागते. यालाच म्हणतात Gobbles technique !
आयुर्वेदाला गरम पाणी आणि मध हे combination  मान्य नाही. आयुर्वेदात सांगितले आहे "उष्णमुष्णारमुष्णे स युक्तम् चोष्मैर्निहन्ति तत्।" म्हणजे मध गरम करून खाणे, गरम पदार्थांबरोबर mix  करून खाणे किंवा गरम पाण्यावरोबर घेणे वर्ज्य आहे.
तुम्ही कधी मध गरम करून पाहिला आहे का? करून बघा. तो गोदासारखा होतो. त्याची चव बदलते, तो कडु होतो. आणि हा असा मध पचायला जड असतो व शरीरात आम (toxins)  निर्माण करतो.

एका  रिसर्च प्रमाणे  मध गरम केला किंवा गरम पाण्यातून घेतला तर त्यत negative physics-chemical reactions होतात आणि त्यात काही विषद्रव्ये (toxic substances)  तयार होतात जसे  त्यात HMF (hydromethyl furfuraldehyde) चे प्रमाण वाढते, pH वाढते,  त्याची consistency change होते, Browning वाढते, त्याची चव बदलते इत्यादी.
जर दररोज गरम पाण्यातून मध घेतल्यास  मधामधील होणारे physics-chemical changes शरीरासाठी हानीकारक (genotoxic, carcinogenic ) असतात. असेच परिणाम मध व तूप समप्रमाणात एकत्र केल्यासही होतो. म्हणून आयुर्वेदाने मध व तुपही समप्रमाणात घेऊ नये असं सांगितले आहे.

आयुर्वेदात सांगितलेले नियम प्रकृती सापेक्ष आणि व्याधी सापेक्ष सांगितलेले आहेत, random नाहीत.  म्हणूनच सोशल मिडीया वरील माहिती वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आयुर्वेद  तज्ञाकडे जाऊन च योग्य तो सल्ला घेतलेला बरा..

Dr Sandhya kadam
9967550282
drsandhyakadam1509@gmail.com

Tuesday, September 29, 2015

THE REAL HERO !


Though I enjoy watching good television shows and movies on TV, yet my professional commitments restrains me from doing so.  When in the evening every one return to their homes from their workplaces, it is the time  for me to get back to my work .

No regrets AS MY FIRST LOVE IS MY WORK, MY DUTY- “DUTY TO SERVE MY PATIENTS”. My commitment towards medical profession precludes me watching TV shows and serials.

Frankly speaking I don’t fancy watching “ Sas –Bahu Zamela”  I love watching sensible and informative TV shows discovery or national geographic, ZEE Marathi or sometimes any good movie.

Other day after dinner when I was enjoying my favorite channel ZEE MARATHI I came to know that the “DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” movie praised by all was going to be broadcasted after two days in the evening. Somehow I missed the opportunity to watch the biopic on “THE REAL HERO” on a big screen.

But this time I never wanted to miss the golden opportunity watching it on small screen. So I decided to take a leave on the day of telecast of that movie.

About The Movie –

“ DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” -

The movie tales the life story of DR PRAKASH AMTE (THE SON OF BABA AMTE WHO DEDICATED ALL HIS LIFE FOR THE PATIENTS SUFFERING FROM LEPROSY)  and his wife Dr MRS MANDAKINI AMTE and  their continuous efforts for the upliftment of the tribals in the Hemalkasa in Gadchiroli district of Maharashtra. His contribution to society is immeasurable.

Just like his father, DR PRAKASH AMTE also had dreamt to serve the poor and the oppressed masses of the society. Unlike other doctors who would choose cozy lifestyle and practice in big metros,  DR PRAKASH AMTE choose to work in tribal areas of Hemalkasa and served tribals.

The eye opener was a trip to Hemalkasa with his father (BABA),  after completing his MBBS degree. He became restless seeing the pathetic life of tribals in the era, where people on the other side of the earth had already reached the moon, and when india is aspiring to be Super power, there were people living like animals. They use to hunt and sleep under the tree without medical facilities, proper housing and education. 

DR PRAKASH AMTE went there to treat them and became a part of them. AND THEN THE STORY BIGINS there in the dense forest of Hemalkasa.

He was not alone in this mission. His lovable, better half DR MANDAKINI (who was his classmate in medical college) and trusted and devoted team of like-minded individuals had joined his hands. 

The path was difficult, and long ranged. They struggle with tribals, wild animals, Naxalites and corrupt government officials. But overcoming every obstacle and sometimes bypassing them Dr Prakash Amte and him team achieved their goal. Today, after years of struggle, Hemalkasa has become “A paradise (NANDANVAN)"- an example to the world "how good can won evil".

There are many people who just live for themselves with their luxurious lifestyle and there are very few who lived for others. They work with passion towards making the world a better place to live in. DR PRAKASH AMTE IS ONE OF THEM. The couple offered selfless service for the sake of humanity.

Nana Patekar (In the lead role of DR PRAKASH AMTE) and Sonali Kulakrni (as Dr Mrs. MANDAKII AMTE) were the best as usual. The supporting cast also did their best.

The story itself is a great and inspirational for youngsters. Many people just talk about development but very few people actually work for people who are oppressed and under-privileged. Indian society needs REAL HEROS like DR PRAKASH AMTE.

THE BIOPIC ON DR PRAKASH AMTE definitely inspires true Indian and sets an example for those who are determined help the poor and oppressed section of the society, despite of hurdles and obstacles. 

“DR PRAKASH BABA AMTE- THE REAL HERO” is THE MUST WATCH MOVIE. The message of humanity,  patriotism and positive thinking  goes to the viewer in clear words. In my opinion youngster must watch this movie again and again.

I would like to watch this movie number of times. The movie had positive impact on my mind. Watching it again and again will keep me consciously awaken within and will lead me to the path of humanity, patriotism and charity.

I would really like to record the movie with the help of TATA SKY TRANSFER and will transfer it to my laptop and android so that I can watch it again and again  whenever I need inspirational thoughts.


Sunday, September 27, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - जाती पत्र , केतकी पत्र, अगस्ती पत्र

जाती पत्र (Jasminum officinale forma grandiflorum)


संस्कृत नाव- जाती, सुमना, हृद्यगंधा
मराठी नाव- जाई
हिंदी नाव- चमेली

जाती गुणधर्माने कडु, तुरट , उष्ण व त्रिदोषहर आहे. 

बाह्य उपयोग-
जाती व्रण रोपक, वेदना शामक, कण्डूघ्न , त्वचा रोगावर उपयुक्त आणि वर्ण्य अर्थात complexion enhancer  आहे. 
याचे उटणे लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो. 

मुख रोग (तोंड येणे) व दंतरोगात याची पाने चावतात किंवा काढल्याने गुळण्या करतात.

शिरःशूल, चक्कर येणे, मानसिक दौर्बल्यामध्ये याचे तेलाने शिरोभ्यंग करतात.

खाज येणार्या त्वचा रोगात व इतर ही त्वचा रोगात याच्या पानाचा लेप करतात.

जात्यादि तेल व घृत हे भाजणे ( burns) व इतर जखमांवरील उत्कृष्ठ औषध आहे. हे व्रण शोधन व रोपण करणारे आहे.

मंत्र- ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।

केतकी पत्र (  Pandanus odorotissimus ) 


संस्कृत नाव- केतक, सूचीपुष्प
मराठी नाव- केवडा
हिंदी नाव- केवडा

केवडा कडु, मधुर, तिखट व उष्ण आहे. केवडा त्रिदोषशामक आहे.

जाती प्रमाणे केवडा सुध्दा व्रण रोपक, वेदना शामक, आहे. 
केवडा केसांच्या वाढीसाठी हितकारक, दौर्गंध्यहर, आक्ष॓पहर आहे. 

आभ्यन्तर उपयोग-
केवडा मस्तिष्क दौर्बल्य जनित्त विकाघरामध्ये दिला जातो. 

हृदयाची धडधड (palpitations)  कमी करणारे आहे.

अग्निमांद्य व अजिर्णावर उपयोगी.

याच्या मुळाचा उपयोग प्रमेहामध्ये होतो.

मंत्र- ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।

अगस्ती पत्र (Sesbania grandiflora )


संस्कृत नाव- अगस्त्य 
मराठी नाव- अगस्ता
हिंदी- अगस्त

अगस्त कडु व शीत आहे म्हणून कफ-पित्त शामक आहे.

मुळ व सालीचा लेप संधिवात व गाऊट मध्ये लावल्यास वेदना कमी होतात. 

लहान मुलांना कफ झाल्यास अगस्तीच्या पानाचा रस 4 थेंब व मध चाटवावा. 

याच्या पानाचा रस अर्धशिशी व अपस्मार (आकडी आल्यास) नाकात 2 थेंब टाकतात. 

याचे पिकलेले फळ बुद्धी वर्धक आहे.
मंत्र- ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।

Saturday, September 26, 2015

21 पत्री व त्याचे औषधी गुणधर्म- दाडिम पत्र, देवदारू पत्र, मरु पत्र, अश्वत्थ पत्र

दाडिम पत्र (Punica granatum)

संस्कृत नाव- दाडिम, दन्तबीज, लोहीतपुष्प
मराठी नाव- डाळींब
हिंदी नाव-डाडम

आयुर्वेदोक्त गुणप्रयोग-

आयुर्वेदानुसार  डाळींब पचायला हलके, मधुर-कषाय- अम्ल रसाचे व अनुष्ण आहे. डाळींब त्रिदोषघ्न आहे (मधुर, कषाय म्हणून पित्त व उष्ण म्हणून कफ वात शामक). 

पित्तावर डाळींबाचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
डाळींबाचे  दाणे अग्निवर्धक व रूची उत्पन्न करणारे  आहेत. तापाने किंवा इतर आजाराने तोंडाची चव गेल्यास डाळींबाचे दाणे खावेत. 

अतिसार (diarrhoea) व प्रवाहीका ( dysentery ) वर याची साल व दाणे प्रशस्त ठरतात. जुन्या अतिसारावर ङाळीँबाची साल व  जिरे एकत्र द्यावे.  

कृमि रोगात याच्या मुळांचा काढा देतात. 
कषाय असल्याने याची  साल सूज कमी करणारी व व्रण भरून आणणारी आहे.

डाळींब बुद्धी ला बल देणारे व बुद्धी वर्धक आहे. 

खोकल्यामध्ये डाळींबाचा रस व मध वरचेवर चाटावा. 

स्वर बिघडला असल्यास रोज एक पिकलेले डाळींब खावे.


मंत्र-  ॐ बटवे नमः। दाडिम पत्रं समर्पयामि ।।


देवदारू पत्र (Cedrus deodara)

संस्कृत नाव- देवदारू, भाद्रदारू, सुरभुरुह  (देवतांच्या प्रदेशात हिमालयात  वृक्ष )
मराठी नाव - देवदार
हिंदी नाव - देवदार

याचा खुप उंच वृक्ष असतो ( साधारणतः  २५० फुट किंवा  त्यापेक्षा अधिक उंच )  खोड मोठे , सरळ असते. फांद्या खाली झुकलेल्या व वर निमुळत्या होत गेलेल्या असतात. पत्र सदाहरित व सुचीपर्णी असतात. फल ४-५ इंच लांब व भुरकट रंगाच्या त्रिकोणाकर बिया असतात.

याचे खोड व तेलाचा औषधात उपयोग होतो

आयुर्वेदानुसार देवदारु लघु गुणाचे, कडू रसाचे व उष्ण असल्याने कफ वात शामक आहे.

याच्या लेपाने सुज व वेदना  कमी होते व व्रण भरुन येतात.  तसेच याचा लेप कृमिघ्न ही आहे.

 वातशामक असल्याने देवदारु आभ्यंतर उपयोगाने वेदना कमी करणारे आहे. सांधे दुखणे, अंग मोडणे यावर देवदार १० ग्रॅम घेवुन त्याचा काढा बनवुन घ्यावा. किंवा  देवदाराचे १ ग्रॅम चूर्ण मधाबरोबर सकाळ - संध्याकाळ घ्यावे.

तिक्त (कडू ) असल्याने अग्निवर्धक, पाचक आहे. तसेच  ते कृमिघ्न व वातानुलोमक आहे.

देव दाराचे चूर्ण मधाबरोबर वारंवार चाटल्याने उचकी थांबते.

देवदार रक्तशोधक, हृदयोत्तेजक आहे .  त्यामुळे हृदयरोग , सुज तसेच रक्तविकारांमध्ये देवादार उपयोगी असते. 

देवदारु गर्भाशयाचे शोधन करते . म्हणून प्रसूती नंतर देवदाराचा काढा देतात. 

मंत्र -ॐ सुराग्रजाय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।


मरु पत्र  ( Majorana hortensis  ) 


संस्कृत नाव- मरुवक, खरपत्र
मराठी नाव- मारवा 
हिंदी नाव- मरुआ 
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा  युक्त सुगंधित क्षुप. याचे पंचांग औषधात वापरता 

आयुर्वेदानुसार मारवा  तिखट, कडू उष्ण आहे. हा कफ वाताजन्य विकारांवर उपयुक्त आहे. 
मरवा विषघ्न , जन्तुघ्न, वेदनाहर,  शोथहर,दुर्गंध नाशन,  त्वचेच्या दोषांचे निवारण करणारा  आहे. 
आमवात, संधिवात, दन्तवेदना व व्रणामध्ये मारव्याचा लेप करतात. किंवा त्याची धुरी घेतात.
मारवा  कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारा  ) व उचकी कमी  करणारा  आहे. 
मारव्याच्या पंचागाच्या काढ्याने भूक वाढते, पचन सुधारते. 
मारवा कृमिघ्न व  विषघ्न ही  आहे.
कष्टार्तव  ( dysmenorrhea ) व मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होत असेल तर मारवा उपयोगी होतो. 

मंत्र - ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।



अश्वत्थ पत्र (Ficus religiosa) 


संस्कृत नाव- अश्वत्थ, बोधिद्रु 
मराठी नाव- पिंपळ 
हिंदी नाव- पीपल 

याचा बहु वर्षायु मोठा वृक्षअसतो . याच्या फळ, छाल, श्रृंग व क्षीराचा उपयोग औषध म्हणून करतात.

याचा बहु वर्षायु मोठा वृक्ष असतो . 

भगवान बुद्धाला या झाडाच्या खाली बसून ज्ञान प्राप्त झाले म्हणून याला बोधी वृक्ष म्हणतात. पिंपळ बुद्धी वर्धक आहे.

अश्वत्थ अर्थात पिंपळ कषाय, मधुर व शीत वीर्याचा आहे. हा कफ-पित्त शामक आहे. 

बाह्य उपयोग- वर्ण्य म्हणजे वर्ण सुधारणारा, सुज व वेदना कमी करणारा, व्रण रोपक आहे. 
वर्ण विकारामध्ये अश्वत्थ श्रृंगाचा लेप लावतात. 

आभ्यन्तर उपयोग -
पिंपळ बुद्धी वर्धक आहे.
ज्यांची जिभेवर जड असते त्यांना जेवण पिंपळ पानावर गरमागरम जेवण दिल्याने फायदा होतो असे म्हणतात.

याची छाल रक्त स्राव थांबवण्यासाठी वापरले जाते. 

डाँग्या खोकल्यात याच्या सालीचा काढा देतात. तसेच फळाचे चूर्ण दम्यात देतात. 

गर्भामध्ये स्थापने साठी अश्वत्थ फलाचे चूर्ण दिले जाते. 
मंत्र - हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।

Friday, September 25, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - अर्जुन पत्र, विष्णूक्रान्त पत्र

अर्जुन पत्र  (Terminalia arjuna)

संस्कृत नाव- अर्जुन, धवल (बाह्य त्वक श्वेत असल्यामुळे )
मराठी नाव- अर्जुन सादडा 
हिंदी नाव- अर्जुन, कहुआ 

शुष्क डोंगराळ प्रदेशात, प्रामुख्याने नदीकिनारी आढळणारा ५० ते ६० फूट उंच वृक्ष.  याचे खोड  उंच सरळ,  बाहेरुन सफेद व आतून रक्त वर्णाचे असते. अर्जुन छालीचाच उपयोग औषधा करीता होतो. 

अर्जुन छालीचा हृदय विकारावारील उपयोग सर्वश्रुत  व प्रसिद्ध आहे. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

आयुर्वेदानुसार अर्जुन कषाय (तुरट )  रसाचा,  गुणधार्माने शीत   आहे व प्रभावाने हृद्य आहे. हृदयाच्या मांस  पेशींचे बल वाढवून त्याचे कार्य सुधारण्याचे काम अर्जुनामुळे होते. अर्जुनामुळे हृदय सशक्त,  उत्तेजित होउन हृत्स्पंदन सुधारते. अनेक संशोधनाद्वारे अर्जुनाच्या या गुणधर्मांवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
अर्जुन छालीने  हृत्शूल (angina pain ) कमी होउन हृदयाचे   कार्य   सुधारते. 
अर्जुन सुज कमी करणारे व anti-oxidant आहे 
अर्जुन रक्तातली चरबी ( cholesterol) कमी करण्याचे काम करते. यासाठी रोज अर्जुन क्षीरपाक घ्यावा.
अर्जुन क्षीरपाक बनवण्याची कृती-
2 ग्रॅम अर्जुन छाल चूर्णं, 1कप दूध व 1/4 कप पाणी घालून दूध शिल्लक राही पर्यंत उककळावे. व थोडी खडी साखर घालून सकाळी नाश्त्यानंतर घ्यावे.
या व्यतिरीक्त रक्त स्राव थांबवण्यास अर्जुन साली चा उपयोग होतो.
हाडं सान्धणारी वनस्पती म्हणून अर्जुन प्रसिद्ध आहे. याची सला पोटात घ्यावी व वरून साल बांधावी.
प्रमेह, मधुमेह व सदाह मुत्र प्रवृती वर ही अर्जुन उपयुक्त आहे.

मंत्र- ॐ  गजदन्ताय नमः। अर्जुन पत्रं समर्पयामि ।।

विष्णुक्रान्त पत्र (Evolvulus alsinoides )

संस्कृत नाव- विष्णूक्रान्त
मराठी नाव- विष्णू क्रान्ता, शंखावली
हिंदी नाव- विष्णूक्रान्ता
डोंगराळ खडकाळ प्रदेशात पावसात उगवणारी वनस्पती.
विष्णूक्रान्ता मेध्य म्हणजे बुद्धी वर्धक आहे.  तसेच  विष्णूक्रान्ताचा संस्थेवर  शामक कार्य होते. त्यामुळे अनिद्रा, नैराश्य वर उपयुक्त.
ज्वर व अतिसारावर याच्या मुळांचा काढा देतात.

मंत्र-  ॐ  विघ्नराजाय नम:। विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि ।।


Wednesday, September 23, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बृहती पत्र, अर्क पत्र


बृहती पत्र (Solanum indicum)




संस्कृत नाव - बृहती, क्षुद्र भण्टाकी (वांग्याप्रमाणे छोटे क्षुप)
मराठी नाव- डोरली
हिन्दी नाव- बडी कटेरी, बनभंटा
याचे प्राय: सर्वत्र होणारे, ३ ते ६ फूट उंचीचे छोटे क्षुप असते. काण्ड व पानांवर काटे असतात. पाने ३ ते ६ इंचाची खण्डीत व रोम युक्त असते. याला निळसर -जांभळ्या रंगाची फुले येतात. फळ छोटे गोलाकार, रेखांकीत, कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळे होते.
दशमुळातील १० औषधांपैकी एक औषध.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे बृहती तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची आहे. उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते.
वेदना युक्त अवयवांवर बृहतीफल, ह्ळद व दारूहळदीचा लेप लावतात.
त्वचेच्या विकारांवर उपयुक्त. कण्डूघ्न म्हणजे खाज कमी करणारे आहे. चाई (एलोपेशिया) या विकारावर याचा रस डोक्यावर लावतात.
पाचन संस्थेच्या विकारांमध्ये जसे भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, अपचन व कृमिं वर याचा उपयोग करतात.
हृदय दौर्बल्य व त्यामुळे येणारी सूज यातही उपयोगी पडते. इतर रक्तज विकारांवरही बृहतीचा उपयोग होतो.
कष्टार्तव किवा dysmenorrhea वर बृहती व बृहती असलेल्या दशमुलारिष्टाचा चांगला उपयोग होतो.
सर्दी, खोकला, दम्या मध्येही उपयुक्त असते. वैद्यांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करावा .

मंत्र - ॐ एकदंताय  नमः। बृहती पत्रं समर्पयामि ।।
 
अर्क पत्र ( Calotropis procera)











संस्कृत नाव - अर्क ( सुर्याप्रमाणे तिक्ष्ण व उष्ण), तूलफल (रूईदार फळ असलेले)
मराठी नाव- रूई
हिंदी नाव- आक, मदार
६ ते ८ फूट उंचीचे क्षुप. याचे कांड (खोड) कठीण, पाने मोठी, आयताकार असून त्यांचा खालील भाग रोमयुक्त असतो. फुले सुगधित, श्वेत वर्णाची वरती बैंगनी रंगाचे ठीपके असलेली असतात. फळे लंबगोल किंवा वेडीवाकडी असतात. सुकल्यावर ती फूटून त्यातून रूई बाहेर पडते.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे रुई  तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची वनस्पती आहे.
उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते. रक्तार्क पुष्प मधुर व कडू रसाचे असल्याने कफ -पित्त शामक आहे.

रुई बाहेरून लावल्यास वेदना व सूज कमी करणारे, जंतुघ्न, व्रणशोधक आहे.
आमवात व संधिवातावर दुखऱ्या सांध्यावर रुईची पाने तेलावर गरम करून बांधावीत.

त्वचाविकारांवरील हे उत्तम औषध आहे. त्वचारोगांवर रूइचे दूध, राईच्या  तेलातून लावतात.
श्वित्र म्हणजे ल्युकोडर्मा वर अर्काक्षीराचा लेप करतात. 

पोटाच्या अनेक विकारांवर  (यकृताचे आजार,  भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, पोट फुगणे अपचन व कृमिं ) रूईच्या मुळाच्या सालीचा उपयोग करतात.

श्लीपद  किंवा हत्तिरोगावरही मुळाची साल देतात. 

खोकला असताना कफ सुटण्याससाठी रुईच्या मुळांचा काढा देतात. 

रुई हे आयुर्वेदातील अतिशय गुणकारी औषध आहे. पण ते अतिशय तीक्ष्ण -उष्ण असल्याने त्याचा वापर जपून व वैद्यकीय सल्ल्यानेच करावा

मंत्र - ॐ कपिलाय नमः। अर्क पत्रं समर्पयामि ।।


२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - शमी पत्र, अपामार्ग पत्र

शमी पत्र  (Propsopis cineraria)


संस्कृत नाव- शमी, तुंगा , केशहंत्री ( केसांचा नाश करणारे )
मराठी नाव- शमी 
हिंदी नाव- छोंकर 
शुष्क प्रदेशात आढळणारे (गुजरात, राजस्थान ) मध्यम उंचीचा, कंटकीत वृक्ष. 

शमी तुरट, मधुर रसाचे व शीत गुणधर्माचे आहे.  शमी  कफ-पित्ताचे  शमन करते.  
याची साल विषघ्न आहे.  
शमीचे फल केश नाशक आहे.
हे बुद्धी वर्धक असल्याने स्मरण शक्ति वाढवण्यासाठी व मस्तिष्क दौर्बल्यामध्ये याचा वापर करतात. 
शमीची पाने रुक्ष, तुरट असून रक्तस्राव थांबवण्यासाठी व अतिसारामध्ये याचा वापर करतात. 
तज्ञांच्या सल्ल्यानेच याचाही वापर करावा. 
मंत्र - ॐ वक्रतुण्डाय  नमः। शमी पत्रं समर्पयामि ।।

अपामार्ग (Achyranthus n)

संस्कृत नाव- अपामार्ग , शिखरी 
मराठी नाव- आघाडा 
हिंदी नाव- चिडचिडी 
संपूर्ण भारतात आढळणारे १ ते ३ फूट उंचीचे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप. याची फुले मंजिरीत साधारणपणे १ फूट लांब, अधोमुख असतात. म्हणून याचे एका पर्यायी नाव प्रत्यक्पुष्पा आहे. याच्या फळामध्ये  तांदळांप्रमाणे दाणे असतात. त्यांना "अपामार्ग तंडूल" म्हणतात. याचे श्वेत व रक्त असे दोन प्रकार असतात. 

आयुर्वेदानुसार अपामार्ग  तिखट, कडु, गुणधर्माने उष्ण आहे व कफ वात शामक आहे. 
ऋषी पंचमीच्या दिवशी याचा उपयोग स्नान करण्यासाठी व तोंड धुण्यासाठी केला जातो. खरोखरच दातदुखीवर याचा उपयोग होतो. 

सुज व वेदना असताना याचा लेप करतात.
कान दुखत असल्यास अपामार्ग सिद्ध तेल कानात घालतात.

वृश्चिक दंशावर याच्या मुळाचा लेप त्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होते. तसेच मुळ पाण्यात उकळून  पिण्यास द्यावे. त्वचेच्या  विकारांवर (खरूज , नायटा) याच्या मुळाचा लेप लावतात. 

अपामार्ग अग्निवर्धक, पाचक पित्तसारक व कृमिघ्न आहे. याचे बिजा मात्र पचायला जड व मालावष्टम्भक आहे. 

आघाड्या पासून बनवलेले औषध " अपामार्ग क्षार " याचा उपयोग खोकला , दमा यावर होतो.
अपामार्ग क्षार मुत्राचे प्रामाणही वाधवतो. म्हणून किडनी स्टोन मध्ये इतर औषधां बरोबर याचा वापर करतात. पण याचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. 

मंत्र - ॐ गुहाग्रजाय  नमः। अपामार्ग  पत्रं समर्पयामि ।।